विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जळगाव दि.४ (जनसंवाद न्युज) : येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. यात मान्यवरांनी १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, मेडल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी, विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जाताना भविष्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे विचार वारसा फाउंडेशन हे दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असते. यंदा देखील रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी रामेश्वर कॉलनी परिसरातील मोठे हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे, गोपाल दर्जी, अशोक पाटील,डॉ. पी. एस. पाटील, वैशाली झाल्टे,अँड. महेश भोकरीकर, अर्चनाताई सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, सुरेश राजपूत, संतोष पाटील, गणेश पाटील, दिलीप धनगर,सतिलाल पाटील, विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख हे मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावनेमधून विशाल देशमुख यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश सांगितला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडून त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचे सांगितले. यानंतर अँड. महेश भोकरीकर व गोपाल दर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सतत मेहनत करून आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवत राहावे. त्यासाठी चिकाटी कायम ठेवावी असे प्रतिपादन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले.
विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी समाजातून मोठे पाठबळ मिळत असते. त्यासाठी विचार वारसा फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रेरणा देण्याचे काम करेल असे प्रतिपादन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. प्रसंगी इयत्ता दहावी, बारावी तसेच इतर विविध परीक्षेत गुणवंत झालेल्या १५२ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केले तर आभार अलकनंदा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष आशिष राजपूत,अभिजित राजपूत, मनिष चौधरी, मयूर डांगे,निखिल शेलार, ऋषिकेश राजपूत,संकेत म्हस्कर, अविनाश पाटील,आकाश तोमर,अमोल पनाड,अमोल ढाकने, चेतन राजपूत, गौरव डांगे, पवन साळूंखे, लोकेश निकम, युवराज राजपूत, देविदास पाटील, प्रफुल सूर्यवंशी, प्रेम बडगुजर,संगीता राजपूत, सुरेखा निकम, मंगला मराठे, देवका हरणे, संगीता गुरव, रिता वाघ, कमल सनसे, पुजा देशमूख,अँड पायल देशमूख, सुरेखा वाणी आदींनी परिश्रम घेतले.