जळगावशैक्षणिक

विचार वारसा फाउंडेशनतर्फे १ जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

जळगाव, दि. 29 (जनसंवाद न्युज): येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे

दरवर्षीप्रमाणे विचार वारसा फाउंडेशन हे दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असते. यंदा देखील रविवार दि. १ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता रामेश्वर कॉलनी परिसरातील मोठे हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविले जाणार आहे.

तरी विद्यार्थ्यांनी त्यांची गुणपत्रिका आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत ही विचार वारसा फाउंडेशन चौकामध्ये प्रकल्प प्रमुख आशिष राजपूत, मयूर डांगे यांच्याकडे जमा करावी असे आवाहन अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button