
जळगाव, दि. 9 (जनसंवाद न्युज): भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादांच्या तळांवर हल्ला करून दहतशतवादाच्या विरोधातील ओपरेशन सिंदूर यशश्वीरित्या राबविले. भारतीय वीर जवानाच्या शौर्याला सलाम म्हणून गुरुवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, युवाशक्ती फाउंडेशन व रमेश पेहलानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अजय खैरनार यांच्यासह जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश पेहलानी ग्रुपचे गायक दिलीप पाटील, रमेश पहेलानी, संजय आहुजा, हेमंत बारी, संदीप सोनार, किशोर मोरे, डॉक्टर ललित पाटील, जगदीश पाटील यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.