
जळगाव, दि. 21 ( जनसंवाद न्युज): अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठ नगर मंत्री म्हणून गौरव राजपूत तर विद्यापीठ अध्यक्ष म्हणून अतुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून देवगिरी प्रांत सहमंत्री वरुणराज नन्नावरे , जिल्हा सहसंयोजक ऋषिकेश बारी व छगन पिसाळ तर विद्यापीठ नगर मंत्री गौरव राजपूत आणि विद्यापीठ अध्यक्ष म्हणून अतुल पटेल उपस्थित होते.
अभाविप नेहमीच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारी व राष्ट्रीय पुनर्निर्मानाच्या व्यापक संकल्पनेत कार्य करणारी जगातील सर्वात मोठी एकमेव संघटना आहे . विद्यार्थ्याच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी व विद्यार्थी हिता साठी अभाविप प्रत्येक वर्षी नवीन कार्यकारणी घोषणा करीत असते . त्याच अनुषंगाने आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सभागृहात अभाविप जळगाव विद्यापीठ नगरांची नूतन कार्यकारणी घोषीत करण्यात आली . यांची नियुक्ती करण्यात आली . प्रसंगी प्रदेश प्रांत सहमंत्री वरुणराज नन्नावरे यांनी परिषद मांडणी करीत जमलेल्या छात्रशक्ती उद्बोधन केले .