
जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): आपल्या भारत देशाने कधीही, स्वतःहून कोणावरही हल्ला केलेला नाहीये. असे असतांना सुध्दा आपला शेजारील देश (ना) पाकिस्तान नेहमी आपल्या देशात अतिरेक्यांद्वारे हिंसाचार घडवत असतो.
अशाच प्रकारे परत एकदा पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी भारताचा स्वर्ग असणाऱ्या व अविभाज्य अंग असणाऱ्या काश्मीर येथील पहलगाम येथील बसरन वेल्ली या पर्यटन स्थळावर मंगळवारी निःशस्त्र, निष्पाप पर्यटकांवर मोठा भ्याड हल्ला करून 26 लोकांना शहीद तसेच 20 पेक्षा जास्त लोकांना जखमी केले. म्हणून आज सै. नियाज अली भैय्या फौंडेशन तर्फे या दुर्दैवी घटनेचा, पाकिस्तान व अतिरेक्यांचा निषेध करण्यासाठी अतिरेक्यांची प्रतिमा दहन करून व उपस्थित सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी दंडांवर काळ्या फिती बांधून तीव्र शब्दात धिक्कार व निषेध केला. या प्रसंगी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी ” दूध मांगोगे तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे, हम से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अतिरेकवाद, आतंकवाद मुर्दाबाद, झिंदाबाद झिंदाबाद हिंदुस्थान झिंदाबाद, जय हिंद जय भारत ” अशा घोषणांनी संपूर्ण भिलपुरा चौक परिसर दणाणून सोडण्यात आला.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना या हल्लाविषयी माहिती दिली. या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, खालीद बागवान दोन्ही लोकांच्या हस्ते अतिरेक्यांची प्रतिमा दहन करण्यात आली. या प्रसंगी हाजी रहेमान शेख, हाजी अब्दुल गनी, डॉ. परिमल मुझुमदार, योगेश मराठे, सय्यद उमर, जमील शेख, सय्यद जावेद, कामिल खान, हाजी शेख सईद, शफी शेख, नितीन शिंपी, रवींद्र खैरनार, नंदूकुमार वाणी, इलियास नुरी, अझीझ मुजावर, हाजी शकुर बादशाह, सलमान महेबूब, झाकीर मास्टर, अकबर इब्राहिम, झुबेर रंगरेझ, नूर मोहम्मद शेख, मतीन नूर बशर, मनोज जैन यांसह अनेक हिंदू मुस्लिम बांधव या प्रसंगी उपस्थित होते.