
जळगाव, दि. 26 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि २०२३ साली स्थापन झाली आहे, या पक्षाचे सर्व जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. या पक्षातर्फे गोरगरीब, वचित, महिला, शेतकरी, बालविकास, रोजगार अशा विविध पातळीवर काम करण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे. सामान्याची होणारी पिळवणूक थाबविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि आगामी काळात सक्रिय राहणार आहे. त्यासाठी कार्यकत्यांच्या माध्यमातून रचना करण्यात आली आहे. तसेच विविध पदाधिकाऱ्याच्या नेमणूकदेखील पुढील काळात केल्या जाणार आहेत.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात सुरु झाले आहे. यामुळे राज्यभरात विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. इच्छुक कार्यकत्यांच्या मुलाखती सुरु असून स्वबळावर सत्ता येण्यासाठी चाचपणी सुरु करण्यात आली आहे. अद्याप उमेदवाराची घोषणा बाकी असून इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाळे (९५२९२४०८४०) यानी केले आहे. त्याकरिता त्याचेशी थेट संपर्क करावा तिकिटासाठी होणारा घोडेबाजार या पक्षात नाही. पात्रतेच्या निकषावर उमेदवारी दिली जाणार आहे
महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय उभा करीत आहे. राज्याला पुरोगामी तसेच संत व समाजसुधारकाची परपरा आहे. मात्र महापुरुषाच्या नावाखाली मोठे राजकारण सताधारी व विरोधक दोन्ही खेळत आहे हे खरेतरे लांछनास्पद आहे आजवर अनेक सताधाऱ्याऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे प्रत्येकाने आपली पोळी शेकूज घेण्यासाठी सतेत काम केले. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याकरिता सक्षम पर्याय हा महाराष्ट्र स्वाभिमान पाटी आता महाराष्ट्रवासियांना उपलब्ध झाला आहे. पार्टीतर्फे उमेदवारी देताना सर्व वर्गातील उमेदवाराना प्राधान्य देण्याचा व संधी देण्याचा प्रयत्न आहे.