जळगावराजकारणशैक्षणिक

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा सुरू करावी मनसेची मागणी

जळगाव, दि. 23 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखेतर्फे एसटीचे विभाग नियंत्रक यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकरता नियमित बस सेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

जळगाव शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दररोज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ गाठणे हा मोठा संघर्ष आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वाहनसेवा मर्यादित आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर विद्यापीठ गाठणे अवघड होते. हे दृश्य केवळ त्यांच्या प्रवासाच्या असुविधेकडेच लक्ष वेधत नाही, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यावरही याचा नकारात्मक परिणाम होत आहे.
विद्यापीठासाठी नियमित आणि विश्वासार्ह एस.टी. बस सेवा सुरू केल्यास, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुखद परिवर्तन घडू शकेल. या सेवेमुळे त्यांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल, शिवाय वेळेवर शिक्षणासाठी हजर राहण्याची हमी मिळेल. याचसोबत, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे तिकीट दर लागू केल्यास, शिक्षणाचा लाभ सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना मिळू शकेल, ज्याने समाजाचा संपूर्ण विकास होईल.

या महत्त्वाच्या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेऊन बस सेवा सुरू करावी अशी तातडीची मागणी मनसे ने केली आहे.
या प्रसंगी मनसे चे जिल्हाध्यक्ष
अॅड. जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळेले,उपमहानगराध्यक्ष सतिष सैंदाणे, रज्जाक सय्यद
चेतन पवार,जितेंद्र पाटील,अमोल पाटील,अविनाश पाटील,साजन पाटील संदीप मांडोळे , ऐश्वर्य श्रीरामे, शिवाजी पाटील दर्शन पाटील सुरज कुमावत संकेत पगारे आकाश ठाकूर उपस्थित होते.

वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये व पोर्टलवर प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button